पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

कर्जमाफीसाठी ८ महिन्यांची तारीख शेतकऱ्यांच्या फायद्याची!’ – बच्चू कडू यांचे सडेतोड स्पष्टीकरण

शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी दिलेल्या ३० जून २०२६ या तारखेवर सविस्तर भाष्य केले आहे. अनेकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ही तारीख शेतकऱ्यांसाठी तोट्याची नसून, यामुळेच या वर्षातील सर्वाधिक अडचणीत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत येईल. आंदोलनादरम्यानची नेमकी परिस्थिती, सरकारची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेण्यात आले, यावर त्यांनी परखड मत व्यक्त केले.

ADS खरेदी करा ×

आंदोलन थांबवण्यामागील निर्णायक क्षण

आंदोलनाला सुरुवात झाल्यावर पहिल्या दोन दिवसांत बच्चू कडू यांनी बैठकीला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, २९ तारखेला परिस्थिती बदलली आणि आंदोलनावर एकामागून एक संकटे कोसळली. पहिले संकट म्हणजे कोर्टाचा रास्ता मोकळा करण्याचे आदेश, ज्यामुळे आंदोलकांची गर्दी कमी झाली. त्यानंतर २९ तारखेला रात्री मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक आंदोलकांना मंगल कार्यालयात आसरा घ्यावा लागला आणि काही लोक थेट घरी निघून गेले. या नैसर्गिक संकटासोबतच, अपंग शेतकऱ्यांना परत जायचे होते, तर पोलिसांनी इतर जिल्ह्यातून येणारे कार्यकर्ते आणि वाहतूक अडवून ठेवली होती. या चारही संकटांमुळे आंदोलन थांबल्यामुळे, आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनाचा फायदा घेऊन काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईला जाऊन चर्चा करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, म्हणूनच मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असे कडू यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment