पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
पंजाब डख यांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस येणार का?
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८वा हप्ता कधी येणार.
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.
Read More

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन.

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत कुऱ्हाड घातली असली तरी, कापसाला चांगला भाव मिळणारच, असा विश्वास ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारची धोरणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासारख्या संस्था व्यापाऱ्यांचे दलाल म्हणून काम करत असून, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू न देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी किंवा इतर योजनांची गरज नसून, केवळ आयात-निर्यात धोरणात हस्तक्षेप थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ADS खरेदी करा ×

सरकारने कापसावरील ११% आयात शुल्क काढून टाकल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस मोठ्या प्रमाणात देशात येत आहे. सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंतची ही मुदत आता वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे, ज्यामुळे आयात शुल्क शून्य राहिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर खालावले असल्याने, आयात शुल्क शून्य ठेवल्यास परदेशी कापूस भारतात येतो आणि भारतीय कापूस उत्पादकांना चांगला दर मिळत नाही. जर ११% किंवा त्याहून अधिक आयात शुल्क ठेवले असते, तर परदेशी कापूस महाग पडला असता आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला असता.

Leave a Comment